उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

Thursday 3 March 2016

शिक्षण परिषद, अमरावती

संत ज्ञानेश्वर सभागृह अमरावती येथे झालेल्या शिक्षण परिषदेत अमरावती जिल्ह्यातील हजारो शिक्षक हजर होते.
रचनावाद म्हणजे काय? रचनावादी पध्दतीने मुले कसे शिकतात, कोण - कोणते उपक्रम राबविता येतील या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी प्रतिभाताई भराडे व माळी सर उपस्थित होते. प्रशिक्षण अतिशय प्रभावी ठरले.

No comments:

Post a Comment