उगवला जेव्हा सूर्य निळा , तेजाळले आकाश फाटलेल्या झोपडीत , थेट पसरला प्रकाश !! पाजळली होती आम्हीच पाती, संघर्ष अन् क्रांतीची असूनि भूमी गौतमाची, शांतीचा नव्हता श्वास !! भेदली होती आम्हीच भिंत, युगायुगाच्या विषमतेची धरणीकंप लागला होऊ, मजबूत धरली कास !! उठविले होते आम्हीच रान, मानवतेच्या मुक्तीचे गारदीही आपलेच होते, भास म्हणावा की आभास !! पेटविले होते आम्हीच पाणी, चवदार तळ्याचे ठेवली शिलगती धग, जरी मेघ दाटती खास !! मागितले होते आम्हीच दाण, समता अन् शांतीचे पेलतो मी दुःख शोषितांचे, हा असू द्या विश्वास !! डॉ. पुरुषोत्तम भापकर (भा.प्र.से)

Thursday 28 April 2016


तुमच्याकडे काही शैक्षणिक उपक्रम किंवा माहिती असेल तर खाली दिलेल्या अपलोड बटणावर क्लिक करुन आपली माहिती अथवा उपक्रम पाठवा. ती माहिती मी तुमच्या नावासह माझ्या ब्लॉगवर प्रसिध्द करीन. माहिती पाठवितांना आपले नाव व शाळेचा जरुर उल्लेख करावा. माहिती पाठविल्यावर मला 9579001954 या क्रमांकावर संपर्क करा.
  धन्यवाद !!


No comments:

Post a Comment